नमस्कार मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात रोज सकाळी उठल्यावर माणूस मोबाईल मध्ये व्हॉट्सअँप मध्ये आपल्या मित्रांना किंवा प्रियजनांना मेसेज किंवा शुभेच्छा (Marathi WhatsApp Status) पाठवतो.
आज आपण व्हॉट्सअँप मराठी स्टेटस (Marathi WhatsApp Status) पाहणार आहोत. हे व्हॉट्सअँप मराठी स्टेटस चे कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या Creator Marathi वेबसाईट वर पाहायला मिळतील. त्यामुळे वेळ वाया न घालवता Marathi WhatsApp Status पाहूया.
51+ Marathi WhatsApp Status

खळखळून हास्य आणि पुरेशी झोप हे,
कोणत्या रोगावरचे रामबाण इलाज आहे.
औषधे फक्त रोगाचा इलाज करतात,
रुग्णाला तर डॉक्टरच बरे करतात.
अडचणी येतात याचा अर्थ असा नाही की नैराश्य यावे, याचा अर्थ तुम्ही तातडीने ताकदीने पुढे जावे असा आहे.
तुम्ही कितीही पात्र असला तरीही,
एकाग्रचित्त होऊनच महान कार्य करू शकता.
तुम्हाला हे पहायला आवडेल:- Friendship Marathi Special Status
सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असणे गरजेचे नाही,
तर महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे.
नशीबावर विश्वास ठेवण्याऐवजी,आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास ठेवा.
– बाबासाहेब आंबेडकर

देवाकडे काही मागण्याची ही वेळ नाही,
तर जे आहे त्याचे आभार मानण्याची वेळ आहे.
आयुष्य कोणासाठी थांबत नाही,
फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात.
सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही,
तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटतात.
सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही,
तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटतात.
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे,
ज्या गोष्टीला लोक म्हणतात की….
हे तुला कधीच जमणार नाही.
हे एकदा नक्की वाचा:-
» Sachin Tendulkar Quotes in marathi
» Energetic Attitude Status In Marathi
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या व्यक्तीने आपले निर्णय बदलतात.
आयुष्यात आपण आपली Image किती
चांगली बनवण्याचा प्रयत्न केला,
तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या
Clearity वरच अवलंबून असते.
आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टीत समाधानमानून हसायला शिका,कारण कोणास ठाऊक मोठ्या गोष्टीमिळेपर्यंत समाधानाने हसू टिकवता येईल का!

मोडतोड करायला ज्ञान लागत नाही,
मात्र तडजोड करायला खूप शहाणपण लागतं.
प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका,
कारण माणसे तुम्हाला काय बोलतात
यावरून त्यांची पात्रता, कळते तुमची नाही.
एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या
ऐवजी पेन दिले गेलेत, याचं कारण हेच की
जस जसे आपण मोठे होत जातो,
तसंतसं आपल्या चुका खोडल्या नाही जात.
काही वेळा आपली चूक नसतानाही
शांत असणे आवश्यक असतं,
कारण जो पर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही,
तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही.
दुसऱ्याचे भले व्हावे असे चिंतणारा माणूस,त्यावेळी आपलेही भले साधत असतो.
राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला,
तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे,
नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा उचलतात.
दुःख तर प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेले असते,
पण प्रत्येकाची त्या दुःखाला सामोरे
जाण्याची पद्धतनिराळी असते.
हे तुम्ही नक्की वाचा:-
» मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी बेस्ट UPI Payment Apps!
» जगातील टॉप १० क्रिकेट स्टेडियम ची नावे अणि माहिती!

रागाच्या एका क्षणाला संयम बाळगला,
तर दुःखाचे शंभर दिवस निश्चितच वाचू शकतात.
अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कोणाच्या चुका उनिवा शोधत बसू नका,
नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका.
स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा,
नाहीतर लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
तुमच्याकडून काम करून घेतील.
समजवण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते.
कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगले,
कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि
समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
आयुष्यात जर का कधी वाईट वेळ नाही आली,
तर आपल्यामधील परके आणि परक्या मधील
आपले कोण याची ओळख कधीच कळणार नाही.
हे सुद्धा नक्की वाचा:- जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी व्यक्तींची नावे!

यशस्वी लोक काही वेगळी गोष्ट करत नाही,
तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात.
संकटावर अशाप्रकारे तुटून पडा की जिंकलो,
तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास.
जर का जीवन समजायचे असेल तर मागे बघा
आणि जर का जीवन जगायचं असेल तर पुढे बघा.
कुणाच्या वाईट सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीला
वाईट ठरवू नका,
कारण जो सूर्य बर्फाला वितळवतो,
तोच सूर्य ओल्या मातीला कठोरही बनवतो.
ज्यांच्याकडे संयम ठेवण्याची क्षमता आहे,
त्यांच्या शक्तीशी ह्या विश्वात कुणीच बरोबरी
करू शकत नाही.
यशस्वी होण्यासाठी अपयश आवश्यक आहे.
कारण पुढच्या वेळी काय करू नये हे त्यातूनच कळते.
आयुष्यात नम्र असणे सर्वात कठीण असते,
आणि जो तुमच्यातील ताठपणा घालवून नम्र बनवतो
तोच खरा गुरु असतो.
इतरांच्या चुका शोधणारे अनेकदा,
आपल्यातील दोष दूर करण्यासाठी वेळ काढत नाहीत.

जीवनातील तीन नियम
• आनंदात वचन देऊ नका.
• रागात उत्तर देऊ नका.
• दुःखात निर्णय घेऊ नका.
बियाणे न पेरतातच धान्याची अपेक्षा करणे,
जसे चुकीचे तसेच कष्ट न घेता,
यशाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
मोठेपणा हा एक असा गुण आहे जो पदाने नव्हे,
तर संस्काराने प्राप्त होतो.
झालेल्या गोष्टीचा विचार करत बसू नका,
भविष्याचे स्वप्न न पाहता आजच्या दिवसावर
लक्ष केंद्रित करा.
तुम्ही किती उंचीवर गेलात हे यश नाही,
तर तुम्ही तुमच्या सोबत किती जणांना
घेऊन तिथ पर्यंत पोहोचलाय ते महत्वाचे आहे.
तुमच्याकडे सध्या जेवढा वेळ उपलब्ध आहे,
तेवढा पुन्हा कधीच असणार नाही.
त्यामुळे त्याचा उपयोग करा आणि यशस्वी व्हा.
तुमचे मन ज्यांना ओळखता येत नाही,
ते लोक तुमच्या शब्दांनाही समजू शकणार नाही.
यशस्वी व्यक्ती आणि इतरांमध्ये मुख्य फरक
हा “ताकद” किंवा “ज्ञानाचा” नव्हे,
तर इच्छाशक्तीच्या असतो.
See Also:- फ्लिपकार्ट इ-कॉमर्स कंपनी बद्दल संपूर्ण माहिती!

तुम्ही कितीही लक्ष गाठले असले,
तरी नजर मात्र पुढील लक्ष्यावरच असायला हवी.
आपण जे बोलतो, जो विचार करतो
आणि जे कार्य करतो,
हे सर्व सामंजस्याने असेल तरच
यातून खरा आनंद मिळेल.
इतरांचा द्वेष काढण्यास वेळ वाया घालवण्या
इतके आपले आयुष्य मोठे नाही.
जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करू शकता,
तर निसंकोच त्यांना मदत करा.
आपल्या कडे जे आहे,
कदाचित दुसऱ्या कोणाकडे असू शकतं नाही,
त्यामुळे आपल्याकडे असलेल्या
प्रत्येक गोष्टीसाठी आनंदी राहा.
जर तुमच्या मध्ये अहंकार असेल आणि
खूप राग येत असेल तर,
तुम्हाला आणखी दुष्मनाची गरज नाही.
दर्जेदार शिक्षण आपल्याला अज्ञान
आणि गरिबीशी युद्धपातळीवर लढण्याची
क्षमता प्रदान करते.
See Also:- रोज सकाळी लवकर उठण्याचे फायदे! जाणून घ्या संपूर्ण माहिती!

ओळखीने मिळालेले काम अल्पकाळ टिकते,
पण कामाच्या बळावर मिळालेली
ओळख आयुष्यभर कायम राहते.
ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यास..
आणि बुद्धी प्राप्त करण्यासाठी
ती समजून घेणे आवश्यक आहे.
माणसाचे स्वप्न आहेत कि उडण्यासाठी पंख मिळो,
आणि पक्षीनां वाटतं कि राहण्यासाठी घर मिळो.
आयुष्य एकच आहे पण,
त्याला चांगल्या प्रकारे जगलं ना तर एकचं खूप आहे.
आपल्या घरातल्यांसाठी मेहनत करा,
कदाचित त्यांना तुम्ही त्यांच्यापेक्षा
खूप मोठे झालेले पाहायचे असेल तर..
आयुष्य हे बिना अपेक्षांचे जगले तर
आजूनच आनंदाने जगता येते.
See Also:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती

जीभ तर सगळ्यांच्या तोंडात असते,
पण यशस्वी तर तेच होतात जे तिला सांभाळू शकतात.
आयुष्य दिवस पुढे ढकलत काढण्यासाठी नाहीय..
ते काहीतरी महान काम करण्यासाठी आहे.
मला स्वत: ला स्वतः बद्दल सांगण्याची गरज नाही,
कारण मला माहित आहे की मी बरोबरच आहे.
मी यशाचे स्वप्न कधीच पाहत बसत नाही.
कारण मी त्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतो.
जर लोक आपल्याला खाली खेचण्याचा
प्रयत्न करीत असतील तर..
याचा अर्थ समजून जावा की,
आपण त्यांच्या खूप पुढे आहोत.
Motivational WhatsApp Marathi Status

दररोज आपल्याला नवीन शिकण्याची संधी मिळते.
त्यां संधीचे आपण सोने केले पाहिजे.
गंजण्यापेक्षा झिजणे श्रेष्ठच.
ध्येय गाठण्यासाठी मेहनतीचा वेग
इतका जोरात हवा की,
अडथळे केव्हा आले आणि
केव्हा गेले समजले पण नाही पाहिजे.
तूम्ही हवेत उडू शकत नसाल तर पळत रहा,
पळू शकत नसाल तर चालत रहा,
चालू शकत नसाल तर रेंगाळत जा,
परंतु पुढे जाणे नेहमी चालू ठेवा.
भूतकाळ आपण बदलू शकत नाही,
परंतु भविष्य अद्याप आपल्या हातामध्ये आहे.
ते नक्की बदलू शकतो.
समुद्राला गर्व होता कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,
इतक्यात एक तेलाचा थेंब आला आणि त्यावर सहज
तरंगत निघून गेला.

आपल्याकडे जे काही आहे आणि
त्यामध्ये आपण काय करू शकतो,
नेहमी याचाच विचार केला पाहिजे.
हातावरच्या रेषा बदलायच्या असतील
तर मेहनतीवर विश्वास ठेवा,
जर प्रयत्न तगडे असतील तर
नशीबालाशी वाकावे लागते इतकेच लक्षात ठेवा.
अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.
निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात.
तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल,
फक्त रोज कष्ट आणि कामात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.
तुमच्याकडे वेळ फार कमी आहे,
तेव्हा कोणा दुसऱ्याचं आयुष्य जगणं सोडून द्या.
तुम्हाला मराठी व्हॉट्सअँप स्टेटस आणि कोट्स (Marathi WhatsApp Status And Quotes) कसे वाटले ते कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच हे व्हॉट्सअँप मराठी स्टेटस आवडल्यास तुमच्या मित्रांना आणि सोशल मीडिया वर शेअर करा.
मराठी माहिती, मराठी रोचक तथ्य आणि मराठी स्टेटस साठी क्रिएटर मराठी वेबसाईट शी जोडून रहा.
One thought on “Marathi WhatsApp Status | 51+ व्हॉट्सअँप मराठी स्टेटस”